आपण केवळ कल्पनाच करीत राहता का?
या लेखाचे शीर्षक जरी कटू असेल परंतु सत्य आहे, हे ही खरे आहे की, कल्पनेत यश समावले आहे, परंतु कल्पना मूर्त स्वरूपात अवतारतात तेव्हा त्यांना खरा अर्थ प्राप्त होतो अन्यथा आपण केवळ भास चिंता निर्माण करीत राहू, खरं तर आपल्या कल्पनात आंतरिक शुद्धता व स्पष्टता आली पाहिजे तिचे कृतीत रूपांतर झाले पाहिजे. कारण माणसाच्या मनात स्पष्टता विशुद्धाता असते जेव्हा त्याच्या हातून घडते तेव्हा ती राहत असते, परंतु स्थिती आपल्याला लक्षात घेता आली पाहिजे, आपण अनेकदा आपण कल्पना खूप चांगल्या पद्धतीने करतो पण त्या प्रत्यक्षात कृतीत आल्याच नाही तर? 1. कल्पना -: कल्पना ही कोणत्याही कार्याची प्रथम कृती आहे, कोणत्याही कृतीची सुरुवात कल्पनेतून होते, कल्पना करून माणूस त्या गोष्टी पर्यंत जाण्याची दिशा शोधता येते, कल्पना ही माणसातील सर्वात मोठी शक्ती आहे, तिच्या सहयाने माणूस असाध्य गोष्ट साध्य करू शकतो, मोठ -मोठया संशोधक यांनी पण कल्पना या शक्ती वापर करून आपले संशोधन सिद्ध केले आहे, ज्या ठिकाणी आपण जाऊ शकत नाही तिथे आपली कल्पना जाते, कल्पना ही माणसातील असम्य शक्ती आहे ती माणसाने जागृत ठेवली पाहिजे, परंतु नुसती कल्प...